जपता नाम विठ्ठलाचे, भय नाही हो काळाचे !
नाममंत्र त्रिअक्षर, करी सदा तो उच्चार!
विठ्ठलनामे सुख, आनंद भानुदासा परमानंद !
महाराष्ट्रातील पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन आपण घेतो त्याचे सर्व श्रेय जाते ते नाथांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांना.
भानुदास महाराज यांचा जन्म इ.स. १४४८ साली एका ब्राह्मण कुळामध्ये झाला. बालपणीच सूर्यनारायणाची उपासना करून त्यांनी त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले होते. प्रपंच चालविण्यासाठी त्यांनी कपड्याचा व्यापार सुरू केला. व्यापाराच्या व्यापात असूनही त्यांनी पंढरीची वारी कधीही चुकविली नाही. भानुदास हे विठ्ठल भक्त होते. त्यांची कीर्ती पसरली ते एका ऐतिहासिक घटनेमुळे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीस आला. श्रीविठ्ठलास आपल्या राज्यात नेवून प्रतिष्ठित करावे, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तसे केले. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्रीविठ्ठल दर्शनार्थ जमू लागले. परंतु, ज्याच्या दर्शनासाठी आपण येथवर आलो आहोत तोच जागेवर नसल्याचे पाहून वारकरी आलाप करू लागले. त्यावेळी भानुदासांनी सर्वांना आश्वासन दिले की, मी विठ्ठलास परत येथे आणीन. काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले.
विठ्ठलाने आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्नांचा हार भानुदासांच्या गळ्यात घालला असे बोलले जाते. भानुदास तेथून बाहेर पडले. पहाटे काकड आरतीच्यावेळी जेव्हा पुजारी तेथे आले असता त्यांच्या लक्षात आले की, देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हार नाही. राजापर्यंत बातमी पोचली. जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढविण्याचे फर्मान राजाने सोडले. सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास संध्या करीत असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला. हाच चोर असावा असं गृहीत धरून सैनिकाने भानुदासांस बंदी बनविले. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदासांच्या मुखातून अभंग प्रकटला, जै आकाश वर पडो पाहे! ब्रह्मगोळ भंगा जाये ! वडवानळं त्रिभूवन खाये ! तरी तुझीच वाट पाहे गां विठोबा ! ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार त्या सुळास पालवी फुटली. ही बातमी राजापर्यंत पोचली. राजाचा थरकांप उडाला, ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवद्भक्त असावा हे त्याच्या लक्षात आले. माझ्या भक्ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही, असा इशारा विठ्ठलाने दिला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्रीविठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी इ.स. १५०६ चा. (आजही कार्तिकी एकादशीस रथोत्सव होतो तो या दिवसाचे स्मरण म्हणून.) भानुदासांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली.
श्रीविठ्ठल दर्शनास जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हातास दरवाज्याजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत, ती म्हणजे श्रीभानुदास महाराजांची समाधी होय. आजही त्यांच्या समाधीदिनाचा उत्सव वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यात येतो. या दिवशी त्यांच्या वंशजांकडून परंपरेने प्रतिवर्षी समाधीचे पूजन, नैवेद्य कीर्तनादी करण्यात येते.
संत श्री भानुदासांच्या भक्तितून अंशत:उतराई होण्यासाठी विठ्ठलाने त्यांच्या वंशात जन्म घेतला तो संत एकनाथ महाराजांच्या रुपात.
भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार,
क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर !
नाममंत्र त्रिअक्षर, करी सदा तो उच्चार!
विठ्ठलनामे सुख, आनंद भानुदासा परमानंद !
महाराष्ट्रातील पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन आपण घेतो त्याचे सर्व श्रेय जाते ते नाथांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांना.
भानुदास महाराज यांचा जन्म इ.स. १४४८ साली एका ब्राह्मण कुळामध्ये झाला. बालपणीच सूर्यनारायणाची उपासना करून त्यांनी त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले होते. प्रपंच चालविण्यासाठी त्यांनी कपड्याचा व्यापार सुरू केला. व्यापाराच्या व्यापात असूनही त्यांनी पंढरीची वारी कधीही चुकविली नाही. भानुदास हे विठ्ठल भक्त होते. त्यांची कीर्ती पसरली ते एका ऐतिहासिक घटनेमुळे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीस आला. श्रीविठ्ठलास आपल्या राज्यात नेवून प्रतिष्ठित करावे, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तसे केले. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्रीविठ्ठल दर्शनार्थ जमू लागले. परंतु, ज्याच्या दर्शनासाठी आपण येथवर आलो आहोत तोच जागेवर नसल्याचे पाहून वारकरी आलाप करू लागले. त्यावेळी भानुदासांनी सर्वांना आश्वासन दिले की, मी विठ्ठलास परत येथे आणीन. काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले.
विठ्ठलाने आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्नांचा हार भानुदासांच्या गळ्यात घालला असे बोलले जाते. भानुदास तेथून बाहेर पडले. पहाटे काकड आरतीच्यावेळी जेव्हा पुजारी तेथे आले असता त्यांच्या लक्षात आले की, देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हार नाही. राजापर्यंत बातमी पोचली. जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढविण्याचे फर्मान राजाने सोडले. सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास संध्या करीत असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला. हाच चोर असावा असं गृहीत धरून सैनिकाने भानुदासांस बंदी बनविले. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदासांच्या मुखातून अभंग प्रकटला, जै आकाश वर पडो पाहे! ब्रह्मगोळ भंगा जाये ! वडवानळं त्रिभूवन खाये ! तरी तुझीच वाट पाहे गां विठोबा ! ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार त्या सुळास पालवी फुटली. ही बातमी राजापर्यंत पोचली. राजाचा थरकांप उडाला, ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवद्भक्त असावा हे त्याच्या लक्षात आले. माझ्या भक्ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही, असा इशारा विठ्ठलाने दिला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्रीविठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी इ.स. १५०६ चा. (आजही कार्तिकी एकादशीस रथोत्सव होतो तो या दिवसाचे स्मरण म्हणून.) भानुदासांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली.
श्रीविठ्ठल दर्शनास जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हातास दरवाज्याजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत, ती म्हणजे श्रीभानुदास महाराजांची समाधी होय. आजही त्यांच्या समाधीदिनाचा उत्सव वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यात येतो. या दिवशी त्यांच्या वंशजांकडून परंपरेने प्रतिवर्षी समाधीचे पूजन, नैवेद्य कीर्तनादी करण्यात येते.
संत श्री भानुदासांच्या भक्तितून अंशत:उतराई होण्यासाठी विठ्ठलाने त्यांच्या वंशात जन्म घेतला तो संत एकनाथ महाराजांच्या रुपात.
भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार,
क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर !