Sunday, 16 November 2025

संतश्रेष्ठ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज 729 वा संजीवन समाधी सोहळा उत्सव

 नामा म्हणे आतां देहासी विटला। स्वरूपीं पालटला ज्ञानदेव!!



!!कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती!! संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज

संतश्रेष्ठ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज 729 वा संजीवन समाधी सोहळा उत्सव 2025



सांधकांचा माय-बाप । दर्शने हरे ताप।

सर्वाभूती सुखरूप । ज्ञानोबा माझा ।।

शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, माऊली म्हणजे प्रेम, करुणा आणि अध्यात्म यांचे अद्वितीय स्वरूप होय. वारकरी संप्रदाय अनादिकालापासून अस्तित्वात असला तरी, त्याला लोकाभिमुख करून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य माऊलींनी केले. संत बहिणाबाईंच्या अभंगातील ओळ

"ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया" याचा अर्थ अगदी यथार्थ आहे.


नाथ संप्रदायातील साधना एकांतात, समाधीत लीन होऊन करण्याची परंपरा आहे. माऊली त्या परंपरेतील असले तरी त्यांनी समाजाचा व्यापक विचार करत ज्ञान लोकभाषेत देण्याचा मार्ग स्वीकारला. संस्कृतमधील तत्त्वज्ञान बहुजन समाजाला सहज



कळणार नाही हे जाणून, त्यांनी मराठीत ग्रंथरचना केली.


माझा म-हाठाची बोलू कौतुके! परी अमृताते पैजा जिंके!

यातूनच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, हरिपाठ असे अमूल्य ग्रंथ जन्माला आले.


माझे जीवीची आवाडी, पंढरपुरा नेईन गुढी!

असे म्हणून माऊलींनी वारीची परंपरा दृढ केली. सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र आणून वैष्णव भावनेत सामील केले. संत नामदेव, संत जनाबाई, संत तुकाराम आणि इतर अनेक संतांनी माऊलींबद्दल अपार प्रेम व्यक्त केले आहे.


माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा वारकरी संप्रदायातील अतिपवित्र आणि हृदयस्पर्शी प्रसंग मानला जातो. हा सोहळा कसा झाला, याचे सविस्तर वर्णन संत नामदेव महाराजांनी लिहून ठेवले. त्यामुळे आपल्याला त्या प्रसंगाची स्पष्ट कल्पना येते. पंढरीहून भक्त, वारकरी, साधुसंत मोठ्या संख्येने आळंदीला आले. संपूर्ण परिसरात तीर्थरूप वातावरण होते. स्वयं भगवान पांडुरंग हजर आहेत, असे वर्णन नामदेवांनी केले आहे. माऊली समाधीस्थ झाल्यावर सर्वत्र शोकाचा उद्रेक झाला. संत निवृत्तीनाथांचे दुःख शब्दातीत होते. त्यांच्या ओळींतून त्यांचे मनोभाव समजतात:

अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य-गुरुपण सिद्ध नेले!

नामदेव महाराज म्हणतात 

नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ ।। 

माऊली समाधीस्थ झाल्यानंतर आळंदीची यात्रा समाप्त झाली. भक्तांनी जयघोष केला आणि देव पांडुरंग नामदेवासह पंढरीला परतले.  आळंदी हे संतांच्या प्रेमाने, कृपेने आणि अध्यात्माने भरलेले असे सिद्धस्थान आहे. येथे देव आणि भक्त यांचा दिव्य मिलाप घडतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान म्हणजे सनातन प्रकाशाशी एकरूप होण्याचा क्षण आहे.


समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर । उठविले भार वैष्णवांचे ॥१॥

आळंकापुरीं सव्य घेतली ते संतीं । दिली भागीरथी ज्ञानालागीं ॥२॥

भैरवापासुनि उगम निरंतर । रानोमाळ झरे तीर्थ गंगा ॥३॥

सैघं इंद्रायणी वाहाती मिळोनी । अखंड क्षणीं वोघ जाती ॥४॥

चालिलें विमान गंधर्व सुरगण । यात्रा परिपूर्ण जाली म्हणती ॥५॥

तीर्थ महोत्साह जाला सारासार । देव ऋषीश्वर परतले ॥६॥

वैष्णवांचे भार निघाले बाहेर । केला जयजयकार सर्वत्रांनीं ॥७॥

पंढरीचा पोहा निघाला बाहेर । गरुडावरी स्वार देव जाले ॥८॥

नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर । जाला असे स्थिर ब्रह्मबोधें ॥९॥

सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज की जय!👏🏻👏🏻


Sunday, 14 June 2020

भक्ती प्रेमाचा मेळा ‘पंढरीची वारी’
अवघें जेणें पाप नासे ! तें हें असे पंढरीसी !!
गात जागा गात जागा ! प्रेम मागा विठ्ठला!!
अवघी सुखाची च राशी ! पुंडलिकाशीं वोळली हे !!
तुका म्हणे जवळी आलें ! उभे ठालें समचरणीं!!
हजारो वारकरी माऊली, दुकोबांच्या सोहळ्यात पंढरीची वाट चालत आहेत. आषाढ म्हटले की, अवघ्या वारकरी संप्रदाय आणि मराठी जणांना आषाढ वारीचे वेध लागतात. देहू आणि आळंदीहून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघताच त्यांच्याबरोबर वारकरी आणि भक्तांचा अथांग सागर टाळ-चिपळ्याच्या निनादात, विठूनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट धरतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक या वारीत सामील होत असतात. उण, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक चढ-उतार पार करत वारकरी पंढरीची वाट चालत असतो. परंतु, चालताना चालेला विठूनामाचा जयघोष त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती करून देत असतो. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांना अशा संकटांची तमा नसते. अशी तळमळ, ओढ, प्रेम, निष्ठा दुसरीकडे क्वचितच पाहण्यास मिळत असावी.
कोणतेही निमंत्रण नाही आग्रह नाही सर्व लोक स्वइच्छेने स्वखुशीने आणि स्वखर्चाने या वारीत सामील होत असतात. एका ध्येयाने इतका मोठा लोकसमूह एकत्र येऊन इच्छित स्थळी सुव्यवस्थितपणे एकमेकांना सहकार्य करत शिस्तीत पोचतो. अाबालवृद्ध, शिक्षित, अडाणी, गरीब, श्रीमंत सर्वच यात सामील होतात.
आषाढी म्हटले, की डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी ! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची वारी. लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात, विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना ‘माऊली-माऊली’ची हाक देतात. हा अनोखा माऊलीच्या अफाट प्रेमाचा मेळावा बघणाऱ्याचे खरेच डोळ्यांचे पारणे फिटतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आषाढीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आळंदी, देहू वरून पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. महाराष्ट्रात बहुसंख्य शेतकरी वर्ग हा खेड्यांपाड्यांतून राहतो आणि त्या वर्गात आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो.
त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या म्हणजेच पंढपूरच्या प्रेमनगरी वारकरी चंद्रभागेच्या प्रेमात न्हाऊन त्याच्या आणि एकमेव फक्त त्याच्याच असणाऱ्या त्याच्या लाडक्या, प्राणप्रिय सावळ्या विठूमाऊलीच्या प्रेमात आकंठ डुंबून आणि ‘त्या’ सावळ्या परब्रह्माच्या चरणी स्वत:ला झोकून देऊन अमाप प्रेमाची लयलूट तर करतोच पण साठवणही करतो आणि पुढे वर्षभर व्यवहारात वापरतो. हा असतो अक्षय असा त्याच्या परम निधानाचा प्रेमाचा साठा - जो कधीच संपूच शकत नाही.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे !
क्रोध अभिमान गेला पावतणी, एक एका लागतील पायी रे !!


Monday, 23 July 2018

भक्ती प्रेमाचा मेळा ‘पंढरीची वारी’




भक्ती प्रेमाचा मेळा ‘पंढरीची वारी’
                                                  गात जागा गात जागा ! प्रेम मागा विठ्ठला!! 
                                                अवघी सुखाची च राशी ! पुंडलिकाशीं वोळली हे !! 
                                                 तुका म्हणे जवळी आलें ! उभे ठालें समचरणीं!! 

हजारो वारकरी माऊली, दुकोबांच्या सोहळ्यात पंढरीची वाट चालत आहेत. आषाढ म्हटले की, अवघ्या वारकरी संप्रदाय आणि मराठी जणांना आषाढ वारीचे वेध लागतात. देहू आणि आळंदीहून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघताच त्यांच्याबरोबर वारकरी आणि भक्तांचा अथांग सागर टाळ-चिपळ्याच्या निनादात, विठूनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट धरतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक या वारीत सामील होत असतात. उण, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक चढ-उतार पार करत वारकरी पंढरीची वाट चालत असतो. परंतु, चालताना चालेला विठूनामाचा  जयघोष त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती करून देत असतो. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांना अशा संकटांची तमा नसते. अशी तळमळ, ओढ, प्रेम, निष्ठा दुसरीकडे क्वचितच पाहण्यास मिळत असावी. 
कोणतेही निमंत्रण नाही आग्रह नाही सर्व लोक स्वइच्छेने स्वखुशीने आणि स्वखर्चाने या वारीत सामील होत असतात. एका ध्येयाने इतका मोठा लोकसमूह एकत्र येऊन इच्छित स्थळी सुव्यवस्थितपणे एकमेकांना सहकार्य करत शिस्तीत पोचतो. अाबालवृद्ध, शिक्षित, अडाणी, गरीब, श्रीमंत सर्वच यात सामील होतात.
आषाढी म्हटले, की डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी ! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची वारी. लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात, विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना ‘माऊली-माऊली’ची हाक देतात. हा अनोखा माऊलीच्या अफाट प्रेमाचा मेळावा बघणाऱ्याचे खरेच डोळ्यांचे पारणे फिटतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आषाढीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आळंदी, देहू वरून पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. महाराष्ट्रात बहुसंख्य शेतकरी वर्ग हा खेड्यांपाड्यांतून राहतो आणि त्या वर्गात आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या म्हणजेच पंढपूरच्या प्रेमनगरी वारकरी चंद्रभागेच्या प्रेमात न्हाऊन त्याच्या आणि एकमेव फक्त त्याच्याच असणाऱ्या त्याच्या लाडक्या, प्राणप्रिय सावळ्या विठूमाऊलीच्या प्रेमात आकंठ डुंबून आणि ‘त्या’ सावळ्या परब्रह्माच्या चरणी स्वत:ला झोकून देऊन अमाप प्रेमाची लयलूट तर करतोच पण साठवणही करतो आणि पुढे वर्षभर व्यवहारात वापरतो. हा असतो अक्षय असा त्याच्या परम निधानाचा प्रेमाचा साठा - जो कधीच संपूच शकत नाही.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे !
क्रोध अभिमान गेला पावतणी, एक एका लागतील पायी रे !!

Sunday, 22 July 2018

अवघें जेणें पाप नासे ! तें हें असे पंढरीसी !!



अवघें जेणें पाप नासे ! तें हें असे पंढरीसी !! 
गात जागा गात जागा ! प्रेम मागा विठ्ठला!! 
अवघी सुखाची च राशी ! पुंडलिकाशीं वोळली हे !! 
तुका म्हणे जवळी आलें ! उभे ठालें समचरणीं!! 

हजारो वारकरी माऊली, दुकोबांच्या सोहळ्यात पंढरीची वाट चालत आहेत. आषाढ म्हटले की, अवघ्या वारकरी संप्रदाय आणि मराठी जणांना आषाढ वारीचे वेध लागतात. देहू आणि आळंदीहून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघताच त्यांच्याबरोबर वारकरी आणि भक्तांचा अथांग सागर टाळ-चिपळ्याच्या निनादात, विठूनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट धरतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक या वारीत सामील होत असतात. उण, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक चढ-उतार पार करत वारकरी पंढरीची वाट चालत असतो. परंतु, चालताना चालेला विठूनामाचा  जयघोष त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती करून देत असतो. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांना अशा संकटांची तमा नसते. अशी तळमळ, ओढ, प्रेम, निष्ठा दुसरीकडे क्वचितच पाहण्यास मिळत असावी. 
कोणतेही निमंत्रण नाही आग्रह नाही सर्व लोक स्वइच्छेने स्वखुशीने आणि स्वखर्चाने या वारीत सामील होत असतात. एका ध्येयाने इतका मोठा लोकसमूह एकत्र येऊन इच्छित स्थळी सुव्यवस्थितपणे एकमेकांना सहकार्य करत शिस्तीत पोचतो. अाबालवृद्ध, शिक्षित, अडाणी, गरीब, श्रीमंत सर्वच यात सामील होतात.
आषाढी म्हटले, की डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी ! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची वारी. लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात, विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना ‘माऊली-माऊली’ची हाक देतात. हा अनोखा माऊलीच्या अफाट प्रेमाचा मेळावा बघणाऱ्याचे खरेच डोळ्यांचे पारणे फिटतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आषाढीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आळंदी, देहू वरून पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. महाराष्ट्रात बहुसंख्य शेतकरी वर्ग हा खेड्यांपाड्यांतून राहतो आणि त्या वर्गात आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या म्हणजेच पंढपूरच्या प्रेमनगरी वारकरी चंद्रभागेच्या प्रेमात न्हाऊन त्याच्या आणि एकमेव फक्त त्याच्याच असणाऱ्या त्याच्या लाडक्या, प्राणप्रिय सावळ्या विठूमाऊलीच्या प्रेमात आकंठ डुंबून आणि ‘त्या’ सावळ्या परब्रह्माच्या चरणी स्वत:ला झोकून देऊन अमाप प्रेमाची लयलूट तर करतोच पण साठवणही करतो आणि पुढे वर्षभर व्यवहारात वापरतो. हा असतो अक्षय असा त्याच्या परम निधानाचा प्रेमाचा साठा - जो कधीच संपूच शकत नाही.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे !
क्रोध अभिमान गेला पावतणी, एक एका लागतील पायी रे !!


Tuesday, 15 May 2018

अधिकमासाविषयी माहिती आणि महत्त्व..


हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते.
परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला 'मलमास' असे सुद्धा म्हणतात. व त्यास पुढील चांद्रमासाचे नाव देतात.
चैत्र पासून अश्‍विन पर्यंतच्या ७ मासांपैकीच एखादा अधिक मास असतो. कारण या काळात सूर्याची गति मंद असते. म्हणून सूर्यास एका राशीतून दुसर्‍या राशीत जाण्यास ३० दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. एकदा आलेला अधिकमास पुन्हा १९ वर्षांनी येतो.
या अधिकमासात वर्ज्य असलेली कृत्ये - देव प्रतिष्ठापना, गृहारंभ, वास्तुशांत, विवाह, उपनयन, तीर्थयात्रा, विशेष मंगलमय कार्ये.
या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण, भगवान विष्णु, पुरुषोत्तम (या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात )
म्हणूनच या महिन्यात विशेषकरून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा अर्चा करतात, तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुखशांती, संसारसुख मिळते.
* अधिकमासात करावयाची व्रते व त्यासंबंधी नियम
१. या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. अंगाला सुगंधी उटी लावावी. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्ये करावीत. मन निर्मळ ठेवावे. या महिन्यात आवळीच्या झाडाखालील स्नानाला विशेष महत्व आहे.
स्नानानंतर म्हणावयाचा मंत्र
गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणम् ।
गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियम् ॥
भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्रविवर्धिनी ।
अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम् ॥
२. या मासात शक्यतो एक वेळेसच अन्नग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे.
३. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा.
४. या महिन्यात आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग करावा.
( उदा. एखादे फळ अथवा एखाद्य रंगाचे वस्त्र वगैरे. )
५. या महिन्यातील दानाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
हिंदू धर्मात मुलगी - जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. (अनारशा ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात.) या महिन्यात नारळ, सुपार्‍या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.
या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्ट मित्रांना, नातेवाईकांना भोजन देतात (या दिंडांना धोंडे सुद्धा म्हणतात यावरुन या महिन्यास 'धोंडे महिना सुद्धा म्हणतात.)
* रोज गाईला पूरण पोळीचा घास द्यावा.
* महिनाभर सतत नामस्मरण करावे - यात कुलदैवताचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ.
* नारायण - श्रीकृष्णाचे स्मरण करावे.
*अपूपदानाचा संकल्प -
ममत्रयस्त्रिंशद्देवतात्मकविष्णुरूपी सहस्त्रांशु श्रीपुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिलपापप्रशमपूर्वं पुत्रपौत्रयुत धनधान्यक्षेमसमृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फलप्राप्त्यापूपच्छिद्रसमसंख्यवर्षसहस्त्रवधी स्वर्लोकनिवासादिकल्पोक्तफलसिद्ध्यर्थं मलमासप्रयुक्तं अपूपदानं करिष्ये ।
याप्रमाणे संकल्प करून दानवस्तूचे पूजन करावे. नंतर ब्राह्मणाचे पूजन करून पुढील श्लोकांनी त्यांची प्रार्थना करावी,
विष्णुरुपी सहस्त्रांशु: सर्वपापप्रणाशन: ।
अपूपान्न प्रदानेन मम पापं व्यपोहतु ॥
नारायण जगद्वीज भास्कर प्रतिरूपक ।
व्रतेनानेन पुत्रांश्च संपदं चापि वर्धय ॥
यस्य हस्ते गदाचक्रे गरुडो यस्य वाहनं ।
शंख: करतले यस्य स मे विष्णु: प्रसीदतु ॥
कलाकाष्ठादिरूपेण निमेषघटिकादिना ।
यो वंचयति भूतानि तस्मै कालात्मने नम: ॥
कुरुक्षेत्रमयं देश: काल: पर्वद्विजो हरि: ।
पृथ्वीसममिमं दानं गृहाण पुरुषोत्तम ॥
मलानांच विशुद्ध्द्यर्ह्तं तव दास्यामि भास्कर ।
इदं सोपस्करं त्रयस्त्रिंशदपूपदानं सदक्षिणाकं सतांबूलं
* पोथीवाचन/सत्संग - अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्रीनारायण प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो.
* अधिक मासात केलेल्या पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रीयांना अखंड सौभाग्याचा व पूत्रपौत्रांचा लाभ होतो,
* अधिकमासात उपोषणाला विशेष महत्व आहे. उपोषणाचे प्रकार एकभुक्त (दिवसातून एकवेळ जेवावे व एकवेळ उपवास करावा.)
* अयाचित (अकस्मात दुसर्‍याकडे जेवायला जाणे.)
* उपोषण - पूर्ण उपवास.
* अशक्त मनुष्याने वरीलपैकी एखादा प्रकार तीन दिवस तरी करावा. न जमल्यास निदान एक दिवस तरी करावा.
* महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्ती होते.
* महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
* महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगास्नान केल्यास सर्वपापापासून मुक्ती मिळते.
* महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते.
* अधिकमासात नित्य कर्मे करावीत त्यापासून दूर जाऊ नये. काम्य कर्मे करून नयेत. जे केल्यावाचून गत्यंतर नाही अशी कर्मे अवश्य करावीत,

हि पोथी श्री संत गोपीनाथ यांनी शके सतराशे बहात्तर साधारण नाम संवत्सरे अधिकमासी वद्य एकादशी मंगळवारी मुमुक्षु नगरीत लिहून पूर्ण केली यात तीस अध्याय असून रोज एक याप्रमाणे वाचावा व शेवटी उद्यापन करून ब्राह्मणाला पोथी दान द्यावी.

Tuesday, 10 October 2017

नांदेड-वाघाळा #पालिकेच्या निवडणुक मतदान 2017



नांदेड-वाघाळा महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता.11) मतदान होत असून #81जागांसाठी #578 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक #2 मध्ये प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर केला जाणार आहे. मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.

महापालिकेच्या एकूण #20प्रभागांतील #81 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण #891 उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यातील #313 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता #578 उमेदवार आहेत. #व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 26 उमेदवार आहेत. 11 ऑक्टोबर 2017रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.

एकूण 20 पैकी 19 प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग सदस्यांचा आहे. एकूण 3 लाख 96 हजार 872 मतदार असून त्यांच्यासाठी 550 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.2वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी734 मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये मतदारांची एकूण संख्या 20हजार 307 इतकी आहे. त्यांच्यासाठी 37 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी 550 मतदार असतील.

Sunday, 10 September 2017

सोंवळ्या ओंवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी!


सोंवळ्या ओंवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी!
श्री जंगली महाराज हे नाव महाराष्ट्राच्या संतमंडळात प्रख्यात आहे. जंगली महाराज हे मध्ययुगीन संत. जंगली महाराज या नावावरुन ते कोणत्या धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. हे नाव इतके रूढ झालं आहे की, ते आपलेच संत आहेत, असे विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटते आणि यातच त्यांचे खर संतत्व दडले आहे. जंगली महाराज म्हटले की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजूत आहे. तीही चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही, कारण महाराजांचे वास्तव्य बराच काळ पुण्यातच होते आणि त्यांचे बरेचसे कार्यही पुण्यातच झाले आहे.
 जंगली महाराज हे अलीकडील काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना माहित नव्हता. तो उपलब्ध करून घेण्यासाठी पुण्यातील उत्कृष्ट चित्रकार डी. डी. रेगे यांनी जवळपास एक तपभर संशोधन करून जणू एक तपचे केले. त्यासाठी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध विभागात गेले. त्यांच्या शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू, फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा केली. जंगली महाराज हे मुस्लिम संत होते. त्यांचे मूळ नाव जंगली शहा. त्यांच्या शिष्यांमध्ये आणि भक्तांमध्ये अनेक जातीधर्मांचे लोक आहेत. मोहंमदशहा कादरी यांनाच जंगली शहा असे म्हणत असत. महाराष्ट्रातील बहुतेक सूफी संत हे कादरी या शाखेचेच होते. या संदर्भात योगसंग्रामाचे कर्ते शेख मोहंमद, सिद्धांतबोधाचे कर्ते शहामुनी, नागेश संप्रदायाचे आलमखान, मुंतोजी बामणी यांचा उल्लेख करता येईल.
जंगली शहा यांचे जन्मगाव सोलापूर जवळील होनमूर्गी हे लहानस खेड आहे. हिंदू इस्लाम आणि वीरशैव अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक या गावात शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आहेत. होनमूर्गीचे कुलदैवत बसवेश्वर हे आहे. तिथे जसे बसवेश्वराचे मंदिर आहे त्याचप्रमाणे मेहबूब सुसानी या पीरांचा दर्गाही आहे. जंगलीशहा हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू आणि फार्सी या भाषा त्यांनी बालपणापासूनच आत्मसात केल्या होत्या. त्यांची प्रवृत्ती धार्मिक असल्यानं त्यांनी वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला.
हजरत शहा ताहेर कादरी सत्तारी हे त्यांचे मुस्लिम गुरू होते. अक्कलकोटच्या परिसरात महान धर्मगुरू म्हणून ते मानले जात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे ताहिरशहांचे समकालीन होते. ते दत्तोपासक होते. जंगलीशहा सर्वसंग-परित्याग करून विरक्त झाले. त्यांनी विजापूर, कुडची, जमखंडी, मिरज, नरसोबाची वाडी, रेठरे आणि नेर्ले अशा विविध ठिकाणी वास्तव्य केलं व लोकहिताची अनेक कामं करायला प्रारंभ केला. वेगवेगळ्या धर्मपंथातील लोकांचा त्यांचा शिष्य-परिवार वाढत वाढत चालला.
 त्यांनी जागोजाग धर्मशाळा, मंदिरं, मशिदी, दर्गे, घाट इत्यादी असंख्य बांधकामं केली व त्यांची नीट व्यवस्था लावून दिली. उत्तरायुष्यात ते पुण्याला आले व तिथंही त्यांनी लोकहिताची कामं केली. कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून जनसामान्यांवर उदात्त संस्कार केले. इ.स. १८९० च्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावली. त्या काळातही ते योगसाधना करीत असत. आपल्या आयुष्याच्या सायंकाळीची चाहूल लागली असल्यानंच जणू भांबुडरयाच्या टेकडीवर आपल्या समाधीची जागा त्यांनी निश्चित करून ठेवली होती. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांनी आपली इहलोकींची यात्रा संपविली.
परें परतें मज न लगे सांगावें, हें तो बरे देवे शिकविले!!
दुसऱ्यातें आम्ही नाही आतळत, जाणोनी संकेत उभा असे!!