आत्मसाक्षात्काराचा सोहळा ‘पंढरीची वारी’
टाळी वाजवावी गुढी उभारावी,
वाट ती चालावी पंढरीच !!
पंढरीची हाट कौलांची पेठ,
मिळाले चतुष्ट वारकरी!!
पावसाळा सुरू झाला की, आषाढात पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचे व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात. या वर्षी ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान १७ जून, तर तुकाराम महाराज यांचा पालखीचे प्रस्थान १६ जूनला होत आहे. या सोहळ्यासाठी सर्व महाराष्ट्रातून दिंड्या येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंड्या येतात.
वारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सद्गुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्तीचा नुसता अविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करताना पांडुरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती. त्यात कोणी उच्च नीच नव्हते, कोण्या एका जातीचे संत नाहीत. संतकवी कोण्या एका गावाचे नाही घराण्याचेही नाहीत.
सेना ‘न्हावी’, सावता ‘माळी’, नामा ‘शिंपी’, गोरा ‘कुंभार’, नरहरी ‘सोनार’ कान्होपागा ‘वारांगना’, एकनाथ ‘ब्राह्मण’, तर चोखा ‘महार’ अशी एकात्मतेती शिकवण. विठ्ठलाच्या गावा जावे, विठ्ठलरूप व्हावे हेच सत्य आहे. विठ्ठलाला माऊली मानणाऱ्या या संताच्या मनात विठ्ठल ही प्रेम-वात्सल्याची मूर्ती आहे. सासुरवाशीण मुलगी माहेराला जाते.
प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यसाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघतात. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलने होतात. चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकऱ्यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकऱ्यांचे सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतांनी दाखविली आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे. एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी सहलीला येणाऱ्याची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचे तसे नाही, वारी ठरावीक तिथीला निघते आषाढीला पोचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्यांच्या भोवती दिडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुठे, सगळे काही ठरवल्यासारखे. गोपालकाल्यात सर्वांच्या शिदोऱ्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रांपचिक दु:खेही वाटून घेतात.
पताकांचे भर मिळाले अपार,
होतो जयजयकार भीमा तीरी !!
हरिनाम गर्जता भय नाही चिंता,
ऐसे बोले गीता भागवत !!
खटनट यावे शुद्ध होऊनी जावे,
दवंडी पिटी भावे चोखा मेळा !!
टाळी वाजवावी गुढी उभारावी,
वाट ती चालावी पंढरीच !!
पंढरीची हाट कौलांची पेठ,
मिळाले चतुष्ट वारकरी!!
पावसाळा सुरू झाला की, आषाढात पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचे व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात. या वर्षी ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान १७ जून, तर तुकाराम महाराज यांचा पालखीचे प्रस्थान १६ जूनला होत आहे. या सोहळ्यासाठी सर्व महाराष्ट्रातून दिंड्या येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंड्या येतात.
वारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सद्गुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्तीचा नुसता अविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करताना पांडुरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती. त्यात कोणी उच्च नीच नव्हते, कोण्या एका जातीचे संत नाहीत. संतकवी कोण्या एका गावाचे नाही घराण्याचेही नाहीत.
सेना ‘न्हावी’, सावता ‘माळी’, नामा ‘शिंपी’, गोरा ‘कुंभार’, नरहरी ‘सोनार’ कान्होपागा ‘वारांगना’, एकनाथ ‘ब्राह्मण’, तर चोखा ‘महार’ अशी एकात्मतेती शिकवण. विठ्ठलाच्या गावा जावे, विठ्ठलरूप व्हावे हेच सत्य आहे. विठ्ठलाला माऊली मानणाऱ्या या संताच्या मनात विठ्ठल ही प्रेम-वात्सल्याची मूर्ती आहे. सासुरवाशीण मुलगी माहेराला जाते.
प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यसाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघतात. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलने होतात. चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकऱ्यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकऱ्यांचे सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतांनी दाखविली आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे. एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी सहलीला येणाऱ्याची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचे तसे नाही, वारी ठरावीक तिथीला निघते आषाढीला पोचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्यांच्या भोवती दिडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुठे, सगळे काही ठरवल्यासारखे. गोपालकाल्यात सर्वांच्या शिदोऱ्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रांपचिक दु:खेही वाटून घेतात.
पताकांचे भर मिळाले अपार,
होतो जयजयकार भीमा तीरी !!
हरिनाम गर्जता भय नाही चिंता,
ऐसे बोले गीता भागवत !!
खटनट यावे शुद्ध होऊनी जावे,
दवंडी पिटी भावे चोखा मेळा !!
No comments:
Post a Comment