संत तुकोबांचे एकनिष्ठ शिष्य ‘निळोबाराय’
तुमचे चरणी राहो मन, करा हे दान कृपेचे !!
नामी तुमचे रंगो वाचा, अंगी प्रेमाचा आविर्भाव !!
संत निळोबाराय हे वारकरी सांप्रदायातील थोर संत. निळोबाराय यांचा जन्म श्री तीर्थक्षेत्र पिंपळनेर (अहमदनगर जिल्हा, ता. पारनेर) इ.स. १६३५ मध्ये झाला. वडील मुकुंदबाबा व आई राधाबाई. घरातील सात-आठ पिढ्यांनी जमवलेली ३००-४०० ग्रंथांची ग्रंथसंपदा मिळाली आणि निळोबांचे वाचन सुरू झाले. त्यांचे वाचन अगदी स्पष्ट. आवाज खणखणीत त्यामुळे आजूबाजूच्या आया-बाया येऊन बसू लागल्या. नंतर गर्दी वाढू लागली. काही पुरुषही येऊ लागले. निळोबा मधून मधून छान निरुपण करत. भावार्थ रामायण झालं, नाथभागवत झालं. पाठोपाठ ज्ञानेश्वरी झाली. मग हे तीनही ग्रंथ त्यांनी स्वहस्ताक्षरात दीड-दोन वर्षांत नकलून काढले.
बघता बघता निळाला सोळावे लागले. मधल्या ४-५ वर्षांच्या काळात त्याने शेषाचार्यांकडून संस्कृत शिकून घेतले होते. पंतकाकांकडून कुलकर्णीचे कामकाज शिकून घेतले. शिवाय ज्ञानदेव, नामदेव व एकनाथ महाराज यांचे अभंग, गौळणी, भारूडं हे सारं नकलून घेतलं.
आता राधाबाईंना (निळोबांच्या आईला) सुनमुख पहायची घाई झाली. पंतांकडे तिने टुमणं लावलं. वाळकीच्या अप्पासाहेब जहागीरदारांची मुलगी मैना ही सून म्हणून मकाशिर्यांच्या घरात आली. आणि वर्षभरातच भगवान रामलिंगाच्या आज्ञेने पंतांचं निर्वाण झालं. निळूचे पितृछत्र हरपले आणि दोनच महिन्यात मातोश्रींनी जीवनयात्रा संपवली.
निळोबास आता पंढरीची ओढ लागली होती. ज्ञानोबा माऊली, नामदेव, चोखोबा, गोरोबा, जनाई, नाथमहाराज, तुकाराम महाराज अशा थोर थोर संतांनी वर्णिलेलं ते विटेवरचे सावळे परब्रह्म डोळे भरून पहावे, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. काही आठवड्यांतच मैनेस दिवस गेले आणि एका पौषात सुमुहूर्तावर सगळे पंढरीस निघाले. जशी पंढरी जवळ येऊ लागली तशी निळोबांची वृत्ती प्रफुल्लित झाली. दुपार टळत आली होती. पंढरीच्या वेशीस पोचले आणि निळोबाने तडक गाडीतून उडी मारली. वेशीसमोर दंडवत घातले. त्यांचे डोळे प्रेमाश्रुंनी भरले होते.
निळोबाचा एक आठवडाभर मुक्काम पंढरीस होता. रोज सायंकाळी निळोबा राऊळी कीर्तन करत असे. ते रसाळ कीर्तन ऐकण्यास रोज गर्दी वाढू लागली. भाविक त्यांना संत निळोबाराय म्हणू लागले. लोकांची उपाधी वाढू लागली तसं निळोबांनी मुक्काम हलवण्याची तयारी केली. पंढरीच्या त्या मुक्कामात श्री पांडुरंग व त्याची पुण्यनगरी यावर निळोबांनी सुमारे दीडशे अभंग रचले. श्री क्षेत्र आळंदीसही तोच प्रकार. श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर मस्तक टेकवता निळोबांस गहिवरून आले. आणि त्यांच्या मुखी ज्ञानेशाची स्तुती उमटली. संत निळोबाराय यांनी श्री तीर्थक्षेत्र पिंपळनेर येथे इ.स.१७५१ मध्ये ठिकाणी निळोबारायांनी समाधी घेतली.
तुमचे चरणी राहो मन, करा हे दान कृपेचे !!
नामी तुमचे रंगो वाचा, अंगी प्रेमाचा आविर्भाव !!
संत निळोबाराय हे वारकरी सांप्रदायातील थोर संत. निळोबाराय यांचा जन्म श्री तीर्थक्षेत्र पिंपळनेर (अहमदनगर जिल्हा, ता. पारनेर) इ.स. १६३५ मध्ये झाला. वडील मुकुंदबाबा व आई राधाबाई. घरातील सात-आठ पिढ्यांनी जमवलेली ३००-४०० ग्रंथांची ग्रंथसंपदा मिळाली आणि निळोबांचे वाचन सुरू झाले. त्यांचे वाचन अगदी स्पष्ट. आवाज खणखणीत त्यामुळे आजूबाजूच्या आया-बाया येऊन बसू लागल्या. नंतर गर्दी वाढू लागली. काही पुरुषही येऊ लागले. निळोबा मधून मधून छान निरुपण करत. भावार्थ रामायण झालं, नाथभागवत झालं. पाठोपाठ ज्ञानेश्वरी झाली. मग हे तीनही ग्रंथ त्यांनी स्वहस्ताक्षरात दीड-दोन वर्षांत नकलून काढले.
बघता बघता निळाला सोळावे लागले. मधल्या ४-५ वर्षांच्या काळात त्याने शेषाचार्यांकडून संस्कृत शिकून घेतले होते. पंतकाकांकडून कुलकर्णीचे कामकाज शिकून घेतले. शिवाय ज्ञानदेव, नामदेव व एकनाथ महाराज यांचे अभंग, गौळणी, भारूडं हे सारं नकलून घेतलं.
आता राधाबाईंना (निळोबांच्या आईला) सुनमुख पहायची घाई झाली. पंतांकडे तिने टुमणं लावलं. वाळकीच्या अप्पासाहेब जहागीरदारांची मुलगी मैना ही सून म्हणून मकाशिर्यांच्या घरात आली. आणि वर्षभरातच भगवान रामलिंगाच्या आज्ञेने पंतांचं निर्वाण झालं. निळूचे पितृछत्र हरपले आणि दोनच महिन्यात मातोश्रींनी जीवनयात्रा संपवली.
निळोबास आता पंढरीची ओढ लागली होती. ज्ञानोबा माऊली, नामदेव, चोखोबा, गोरोबा, जनाई, नाथमहाराज, तुकाराम महाराज अशा थोर थोर संतांनी वर्णिलेलं ते विटेवरचे सावळे परब्रह्म डोळे भरून पहावे, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. काही आठवड्यांतच मैनेस दिवस गेले आणि एका पौषात सुमुहूर्तावर सगळे पंढरीस निघाले. जशी पंढरी जवळ येऊ लागली तशी निळोबांची वृत्ती प्रफुल्लित झाली. दुपार टळत आली होती. पंढरीच्या वेशीस पोचले आणि निळोबाने तडक गाडीतून उडी मारली. वेशीसमोर दंडवत घातले. त्यांचे डोळे प्रेमाश्रुंनी भरले होते.
निळोबाचा एक आठवडाभर मुक्काम पंढरीस होता. रोज सायंकाळी निळोबा राऊळी कीर्तन करत असे. ते रसाळ कीर्तन ऐकण्यास रोज गर्दी वाढू लागली. भाविक त्यांना संत निळोबाराय म्हणू लागले. लोकांची उपाधी वाढू लागली तसं निळोबांनी मुक्काम हलवण्याची तयारी केली. पंढरीच्या त्या मुक्कामात श्री पांडुरंग व त्याची पुण्यनगरी यावर निळोबांनी सुमारे दीडशे अभंग रचले. श्री क्षेत्र आळंदीसही तोच प्रकार. श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर मस्तक टेकवता निळोबांस गहिवरून आले. आणि त्यांच्या मुखी ज्ञानेशाची स्तुती उमटली. संत निळोबाराय यांनी श्री तीर्थक्षेत्र पिंपळनेर येथे इ.स.१७५१ मध्ये ठिकाणी निळोबारायांनी समाधी घेतली.
No comments:
Post a Comment