कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ! रखुमाईच्या पती सोयरिया !!
गोड तुझें रूप गोड तुझें नाम ! देईं मज प्रेम सर्व काळ!!
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत. संत भगवानबाबा यांचा जन्म २९ जुलै, इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा येथे झाला. ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नंतरच्या कालखंडात संतपदाला पोचलेले ते पहिले महापुरुष आहेत. त्यांना स्वतः तुकाराम महाराज यांनीच स्वप्नबोध केला होता, असे मानले जाते. तुकारामोत्तर कालखंडात वारकरी धर्माला प्रेरणा देण्याचे महान कार्य त्यांनी केले. ते संत एकनाथांच्या परंपरेतील नाथफडाचे प्रसिद्ध टाळकरी संत होते. ते भागवत धर्माचा झेंडा फडकाविणारे एक प्रबोधनकर्ते कीर्तनकार होते. त्यांच्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, त्यांनी पाण्यावर तरंगून ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते.
भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच’ असे लोक गौरवाने म्हणत. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यांच्या ऐश्वर्यशाली व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व कार्याचा त्यांच्या काळातील समाजावर फार मोठा प्रभाव पडलेला होता व तो तेवढाच परिणामकारकपणे आजही अनुभवास येतो. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा समाज आहे. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली. सर्वधर्मसमभाव, अंधश्रद्धानिर्मूलन, शिक्षणप्रसार, वार्षिक नारळी हरिनामसप्ताह, पंढरपूरवारी यासारखे जनकल्याणचे काम करणारे एक आदर्श समाजमार्गदर्शक, समाजसुधारक होते. भगवानगडाची संस्थापना त्यांनी केली. भगवानगड आज वारकरी धर्म चळवळीचे मोठे केंद्र बनले आहे. महाराजांनी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी इहलोकीची यात्रा संपवून वैकुंठगमन केले. प्राणत्याग करताना त्यांनी वारकरी महावाक्याचा जयघोष केल्याचे सांगितले जाते.
विठो माउलिये हाचि वर देईं ! संचरोनि राहीं हृदयामाजी!!
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक! तुझे पायीं सुख सर्व आहे!!
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ! रखुमाईच्या पती सोयरिया !!
गोड तुझें रूप गोड तुझें नाम ! देईं मज प्रेम सर्व काळ!!
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत. संत भगवानबाबा यांचा जन्म २९ जुलै, इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा येथे झाला. ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नंतरच्या कालखंडात संतपदाला पोचलेले ते पहिले महापुरुष आहेत. त्यांना स्वतः तुकाराम महाराज यांनीच स्वप्नबोध केला होता, असे मानले जाते. तुकारामोत्तर कालखंडात वारकरी धर्माला प्रेरणा देण्याचे महान कार्य त्यांनी केले. ते संत एकनाथांच्या परंपरेतील नाथफडाचे प्रसिद्ध टाळकरी संत होते. ते भागवत धर्माचा झेंडा फडकाविणारे एक प्रबोधनकर्ते कीर्तनकार होते. त्यांच्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, त्यांनी पाण्यावर तरंगून ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते.
भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच’ असे लोक गौरवाने म्हणत. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यांच्या ऐश्वर्यशाली व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व कार्याचा त्यांच्या काळातील समाजावर फार मोठा प्रभाव पडलेला होता व तो तेवढाच परिणामकारकपणे आजही अनुभवास येतो. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा समाज आहे. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली. सर्वधर्मसमभाव, अंधश्रद्धानिर्मूलन, शिक्षणप्रसार, वार्षिक नारळी हरिनामसप्ताह, पंढरपूरवारी यासारखे जनकल्याणचे काम करणारे एक आदर्श समाजमार्गदर्शक, समाजसुधारक होते. भगवानगडाची संस्थापना त्यांनी केली. भगवानगड आज वारकरी धर्म चळवळीचे मोठे केंद्र बनले आहे. महाराजांनी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी इहलोकीची यात्रा संपवून वैकुंठगमन केले. प्राणत्याग करताना त्यांनी वारकरी महावाक्याचा जयघोष केल्याचे सांगितले जाते.
विठो माउलिये हाचि वर देईं ! संचरोनि राहीं हृदयामाजी!!
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक! तुझे पायीं सुख सर्व आहे!!