विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेदभ्रम अमंगळ !!
आईका जी तुम्ही भक्त भागवत ! कराल तें हित सत्य करा !!
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ! वर्म सर्वेश्र्वरपूजनाचें !!
तुका म्हणे एका देहाचे अवयव ! सुख दु:ख जीव भोग पावे !!
अखंड कीर्तनामुळे काया ब्रह्मभूत झालेले साक्षात्कारी सत्पुरूष, जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे, जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे जगद्गुरू म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतांपैकी एक संतकवी. पुणे जिल्ह्यातील देहू येथे इ. स. १६०८, माघ शु. पंचमीला त्यांचा जन्म झाला. अभंग म्हटला की, तो फक्त तुकोबांचाच अभंग. एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. महाराजांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच. आजही तितकीच लोकप्रियता ‘अभंग’ला आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा ! इतरांनी वहावा भार माथा !! असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ! शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं !! असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचा सार सांगितला. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ! भेदाभेद-भ्रम अमंगळ !! या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली. म्हणून भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले आहे. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते आजही स्थिर आहेत. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्मय’ आहे. महाराजांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. महाराज १७-१८ वर्षांचे असतांना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. सतत विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत: करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी ! आणिक न करी तीर्थव्रत !! पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते. वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्र्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्ये. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन, कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार, दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका, विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत की, असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात महाराजांनी ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला. आणि सेवटी फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९) महाराज ब्रह्मलीन झाले.
आम्ही जातो आमुच्या गावा !! आमुचा राम राम घ्यावा !!
सकळही माझी बोळवण करा !! परतोनि घरा जावे तुम्ही !!
वाढवेळ झाला उभा पांडुरंग ! वैकुंठा श्रीरंग बोलावतो !!
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी ! सकळा सांगावी विनंती माझी !!
अंत:काळी विठो आम्हासी पावला ! कुडीसहित झाला गुप्त तुका !!
--भागवत पेटकर
आईका जी तुम्ही भक्त भागवत ! कराल तें हित सत्य करा !!
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ! वर्म सर्वेश्र्वरपूजनाचें !!
तुका म्हणे एका देहाचे अवयव ! सुख दु:ख जीव भोग पावे !!
अखंड कीर्तनामुळे काया ब्रह्मभूत झालेले साक्षात्कारी सत्पुरूष, जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे, जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे जगद्गुरू म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतांपैकी एक संतकवी. पुणे जिल्ह्यातील देहू येथे इ. स. १६०८, माघ शु. पंचमीला त्यांचा जन्म झाला. अभंग म्हटला की, तो फक्त तुकोबांचाच अभंग. एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. महाराजांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच. आजही तितकीच लोकप्रियता ‘अभंग’ला आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा ! इतरांनी वहावा भार माथा !! असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ! शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं !! असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचा सार सांगितला. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ! भेदाभेद-भ्रम अमंगळ !! या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली. म्हणून भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले आहे. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते आजही स्थिर आहेत. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्मय’ आहे. महाराजांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. महाराज १७-१८ वर्षांचे असतांना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. सतत विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत: करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी ! आणिक न करी तीर्थव्रत !! पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते. वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्र्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्ये. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन, कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार, दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका, विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत की, असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात महाराजांनी ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला. आणि सेवटी फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९) महाराज ब्रह्मलीन झाले.
आम्ही जातो आमुच्या गावा !! आमुचा राम राम घ्यावा !!
सकळही माझी बोळवण करा !! परतोनि घरा जावे तुम्ही !!
वाढवेळ झाला उभा पांडुरंग ! वैकुंठा श्रीरंग बोलावतो !!
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी ! सकळा सांगावी विनंती माझी !!
अंत:काळी विठो आम्हासी पावला ! कुडीसहित झाला गुप्त तुका !!
--भागवत पेटकर