नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ..!
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६,वार, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. श्री क्षेत्र आळंदीतील कार्य संपविल्यानंतर माउलींना तिर्थयात्रा करूशी वाटली. तेव्हा त्यांना आपल्याबरोबर संत नामदेव महाराज असावो म्हणून त्यांना घेण्याकरत माउली पंढरपूरला गेले.
कैलासाचा वास अधिक सिद्धबेट, विष्णूचें वैकूंठ पुरातन!
या ठिकाणी ज्ञानदेवांनी १०८ वेळा समाधी घेतली आहे. असे हे स्थळ सकळ सिद्ध आणि अनादि आहे.
यानुसार, सर्व संतमंडळी दिंड्या पताका घेउन खिन्न मनाने खेद करत अलंकापूरीत निघाले.निवृत्तीनाथ महाराज पण त्यांचाही कंठ दाटून आला. सोपान, मुक्ता, यांना तर रडूच कोसळले, नामदेव महाराजांच्या शोकास तर पारावारच राहिला नाही. त्याचप्रमाणे नारा, विठा, गोंदा, महादा आदीकरून संत मंडळींना फार वाईट वाटले. व ते खेद करत सर्व इंद्रायणीच्या तीरी आले. त्यात सर्वात पुढे नारा विठा चालत होते.अशा प्रकारे सर्व भक्तमंडळी सौदंडीच्या झाडाखाली बसले. माउली आता समाधी घेणार म्हणून सर्वांनाच खेद वाटत होता. यानंतर सर्व संत मंडळी सौदंडीच्या झाडाखालून उठून जुनाट असे पवित्र शिवपीठ येथे आले.
अशा तऱ्हेने एकीकडे माउलींच्या समाधिची तयारी होत होती तर दुसरीकडे उपस्थीतांचे कंठ दाटून येत होते. पाण्यातील मासा ज्याप्रमाणे पाण्याविना तळमळतो त्याप्रमाणे माउली आपल्यात यापुढे नाहित. या भावनेने समस्त उपस्थित जनसमुदायाचे हृदय हेलावून गेले. प्रत्येकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावू लागल्या. त्यावेळी स्वता माऊली उपस्थितांना म्हणाले, तुम्ही जर असे करू लागले तर समाधिला उशिर होईल.
आठवाल फार, लागे उशिर समाधीसी.!!
असे म्हणून त्यांननी सिद्धेश्वरा समोरिल नंदी बाजूला सारून पूर्वीचे समाधीचे जुनाट स्थान दाखविले.
अष्टोतरशे वेळ समाधि निश्चळ, पूर्वी तुझे वहनाखाली!
नामदेव महाराज म्हणतात, हे जुनाट स्थान माउलींनी आम्हाला दाखविले हे पाहून नारा विठा गोंदा महादा यांना समाधिची जागा स्वच्छ करावयास सांगितली. नंतर हे सर्व संत मंडळी वर आली. या वेळी माउलींची सर्वांनी शोडषोपचारे पूजा केली व कंठ वाटून येउन सर्वांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर आले. नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितले की, तुम्ही सर्वजण भेटा माउली समाधिकडे जात आहेत. सर्व भेटल्यानंतर निवृत्तीनाथ व भगवंतनाने एका एका हाताला धरून माउलींना समाधी स्थानावर वसविण्याकरता चालले. ज्ञानदेव आता आसनावर जावून बसले व भक्त मंडळींनी त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. नंतर भगवंताने ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात ठेवला नंतर दर्शन घेतले. त्यावर देव पुढे म्हणाले, हे पहा जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत. माउलींची समाधी तोपर्यंत स्थिर राहिल.
देव म्हणे ज्ञानेश्वरा.चंद्र तारा जव दिनकरा!
तव तुम्ही समाधि स्थिरा,राहे तारा हे निरंतर !!
त्यावेळी त्यांची अवस्था काय झाली हे वर्णन करणे कठिण आहे.अशा परिस्थितीतही भगवंतांनी सर्वांना कठिण अंतकरणाने बाहेर आणले व त्यास शिळा बसविली. माउलींनी समाधी घेतल्यानंतर या भक्त मंडळींनी काय अवस्था झाली हे नामदेव महाराज वर्णन करतात.
वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, आणिकाच्या डोळा अश्रु येती!!
अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरूपण सिद्धी नेले!!
भगवंताने देखील आपले मन पुष्कळ आवरले पण नाईलाज झाला.भगवंताच्या डोळ्याला देखिल अश्रु आले. त्यावेळी रखुमाई म्हणाल्या हो आतापर्यंत पुष्कळसे गेले त्याबद्दल खेद केला नाही. कित्येक जन्माला आलेत त्याबद्दल आनंदही नाही. देव रूक्मिणीला म्हणतात की, रूक्मिणी मी हा एक योगी डोळ्याने पाहिला आहे आणि त्रैलोक्याचे हेच एक जीवन आहे.
देवो म्हणीती रूक्मिणी, हा येचि युगी देखील नयनी!
हेचि ज्ञान संजिवनी,जाण त्रिलोक्यासी!!
भगवंत आतापर्यंत कोणाकरिताही रडले नाही परंतु माउलींच्या समाधिचे वेळी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. तेवढ्यात नामदेव महाराज पुढे आले व भगवंताला म्हणाले माउली सोडून गेले त्यासाठी माझा जीव कासावीस होत आहे. भगवंत नामदेवांची सजूत घालू लागले. असे नामदेवा रडू नकोस ते कोण होते त्याची तुला कल्पना नाही. अशाप्रकारे सर्वच मंडळी शोक करत होते. एवढ्यात भगवंताने सांगितले, आता आपणास पंढरपूरला जावयाचे आहे. असे म्हटल्यावर सर्वांनी कठिण अंतकरणाने ज्ञानदेवांच्या समाधिला प्रदक्षिणा घातली व सर्वांनी नमस्कार केला. सर्व मंडळी बाहेर पडले माउलींच्या नावाचा जयजयकार केला.
इंद्रायणी काठी देवाची आळंदी ! लागली समाधी ज्ञानेशाची !
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६,वार, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. श्री क्षेत्र आळंदीतील कार्य संपविल्यानंतर माउलींना तिर्थयात्रा करूशी वाटली. तेव्हा त्यांना आपल्याबरोबर संत नामदेव महाराज असावो म्हणून त्यांना घेण्याकरत माउली पंढरपूरला गेले.
कैलासाचा वास अधिक सिद्धबेट, विष्णूचें वैकूंठ पुरातन!
या ठिकाणी ज्ञानदेवांनी १०८ वेळा समाधी घेतली आहे. असे हे स्थळ सकळ सिद्ध आणि अनादि आहे.
यानुसार, सर्व संतमंडळी दिंड्या पताका घेउन खिन्न मनाने खेद करत अलंकापूरीत निघाले.निवृत्तीनाथ महाराज पण त्यांचाही कंठ दाटून आला. सोपान, मुक्ता, यांना तर रडूच कोसळले, नामदेव महाराजांच्या शोकास तर पारावारच राहिला नाही. त्याचप्रमाणे नारा, विठा, गोंदा, महादा आदीकरून संत मंडळींना फार वाईट वाटले. व ते खेद करत सर्व इंद्रायणीच्या तीरी आले. त्यात सर्वात पुढे नारा विठा चालत होते.अशा प्रकारे सर्व भक्तमंडळी सौदंडीच्या झाडाखाली बसले. माउली आता समाधी घेणार म्हणून सर्वांनाच खेद वाटत होता. यानंतर सर्व संत मंडळी सौदंडीच्या झाडाखालून उठून जुनाट असे पवित्र शिवपीठ येथे आले.
अशा तऱ्हेने एकीकडे माउलींच्या समाधिची तयारी होत होती तर दुसरीकडे उपस्थीतांचे कंठ दाटून येत होते. पाण्यातील मासा ज्याप्रमाणे पाण्याविना तळमळतो त्याप्रमाणे माउली आपल्यात यापुढे नाहित. या भावनेने समस्त उपस्थित जनसमुदायाचे हृदय हेलावून गेले. प्रत्येकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावू लागल्या. त्यावेळी स्वता माऊली उपस्थितांना म्हणाले, तुम्ही जर असे करू लागले तर समाधिला उशिर होईल.
आठवाल फार, लागे उशिर समाधीसी.!!
असे म्हणून त्यांननी सिद्धेश्वरा समोरिल नंदी बाजूला सारून पूर्वीचे समाधीचे जुनाट स्थान दाखविले.
अष्टोतरशे वेळ समाधि निश्चळ, पूर्वी तुझे वहनाखाली!
नामदेव महाराज म्हणतात, हे जुनाट स्थान माउलींनी आम्हाला दाखविले हे पाहून नारा विठा गोंदा महादा यांना समाधिची जागा स्वच्छ करावयास सांगितली. नंतर हे सर्व संत मंडळी वर आली. या वेळी माउलींची सर्वांनी शोडषोपचारे पूजा केली व कंठ वाटून येउन सर्वांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर आले. नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितले की, तुम्ही सर्वजण भेटा माउली समाधिकडे जात आहेत. सर्व भेटल्यानंतर निवृत्तीनाथ व भगवंतनाने एका एका हाताला धरून माउलींना समाधी स्थानावर वसविण्याकरता चालले. ज्ञानदेव आता आसनावर जावून बसले व भक्त मंडळींनी त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. नंतर भगवंताने ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात ठेवला नंतर दर्शन घेतले. त्यावर देव पुढे म्हणाले, हे पहा जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत. माउलींची समाधी तोपर्यंत स्थिर राहिल.
देव म्हणे ज्ञानेश्वरा.चंद्र तारा जव दिनकरा!
तव तुम्ही समाधि स्थिरा,राहे तारा हे निरंतर !!
त्यावेळी त्यांची अवस्था काय झाली हे वर्णन करणे कठिण आहे.अशा परिस्थितीतही भगवंतांनी सर्वांना कठिण अंतकरणाने बाहेर आणले व त्यास शिळा बसविली. माउलींनी समाधी घेतल्यानंतर या भक्त मंडळींनी काय अवस्था झाली हे नामदेव महाराज वर्णन करतात.
वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, आणिकाच्या डोळा अश्रु येती!!
अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरूपण सिद्धी नेले!!
भगवंताने देखील आपले मन पुष्कळ आवरले पण नाईलाज झाला.भगवंताच्या डोळ्याला देखिल अश्रु आले. त्यावेळी रखुमाई म्हणाल्या हो आतापर्यंत पुष्कळसे गेले त्याबद्दल खेद केला नाही. कित्येक जन्माला आलेत त्याबद्दल आनंदही नाही. देव रूक्मिणीला म्हणतात की, रूक्मिणी मी हा एक योगी डोळ्याने पाहिला आहे आणि त्रैलोक्याचे हेच एक जीवन आहे.
देवो म्हणीती रूक्मिणी, हा येचि युगी देखील नयनी!
हेचि ज्ञान संजिवनी,जाण त्रिलोक्यासी!!
भगवंत आतापर्यंत कोणाकरिताही रडले नाही परंतु माउलींच्या समाधिचे वेळी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. तेवढ्यात नामदेव महाराज पुढे आले व भगवंताला म्हणाले माउली सोडून गेले त्यासाठी माझा जीव कासावीस होत आहे. भगवंत नामदेवांची सजूत घालू लागले. असे नामदेवा रडू नकोस ते कोण होते त्याची तुला कल्पना नाही. अशाप्रकारे सर्वच मंडळी शोक करत होते. एवढ्यात भगवंताने सांगितले, आता आपणास पंढरपूरला जावयाचे आहे. असे म्हटल्यावर सर्वांनी कठिण अंतकरणाने ज्ञानदेवांच्या समाधिला प्रदक्षिणा घातली व सर्वांनी नमस्कार केला. सर्व मंडळी बाहेर पडले माउलींच्या नावाचा जयजयकार केला.
इंद्रायणी काठी देवाची आळंदी ! लागली समाधी ज्ञानेशाची !