Saturday, 17 January 2015

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीये सुस्वरे आळविती ॥१॥

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीये सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करू ॥३॥
येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥
तुकोबांच्या पत्‍नी सौ. जिजाबाई रोज घरचा कामधंदा आटोपून स्वयंपाक उरकून तुकोबांचे जेवण घेऊन भंडाऱ्यावर जात असत. तुकोबांना जेऊ घातल्यानंतर आपण जेवत असत, तुकोबा परमार्थ साधनेत निमग्न असता - विदेह स्थितीत असता त्यांची सर्व काळजी सौ. जिजाबाई घेत असत. तुकोबांच्या परमार्थात जिजाबाईंचा फार मोठा वाटा होता. शरीर कष्टवून परोपकार, संत वचनाचे पाठ- पाठांतर, वाचणे विठ्ठलाचे नामस्मरण आणि चित्ताने विठोबाचे ध्यान - अशी साधना अखंड चालू असता तुकोबांच्या स्वप्नात श्रीपंढरीराय नामदेवरायांना घेऊन आले. त्यांनी तुकोबांना जागे केले आणि जगत् उध्दाराकरितां कवित्व करण्याचे काम सांगितले.
५. कवित्वाची स्फूर्ती आणि जलदिव्य
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
सांगितले काम करावे कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ॥धृ॥
माप टाकी सळ धरिली विठ्ठले । थापटोनि केले सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटी लावी तुका ॥३॥
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसे टाकून । आतां उदासीन न धरावे ॥धृ॥
सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारे विश्रांती पावईन ॥२॥
नामदेवापायी तुक्या स्वप्नी भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥
तुकोबांचा स्वतःचा उध्दार झाला होता.आता त्यांना लोकोध्दार करावयाचा होता. त्यांना लाभलेला प्रसाद लोकांना वाटावयाचा होता. परमात्म्याचा संदेश, निरोप त्यांना घरोघर पोहोचावयाचा होता.
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥
तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली.
यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती । पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥
आणि तुकोबांचे मुखातून अभंगगंगा वाहू लागली. सभाग्यश्रोते श्रवण करू लागले.
बोलावे म्हणून बोलतो उपाय । प्रवाहेचि जाये गंगाजळ ॥१॥
भाग्य योगे कोणा घडेल श्रवण । कैचे तेथे जन अधिकारी ॥२॥
तुकोबांच्या अभंगातून श्रुतीशास्त्राचे मथित, महाकाव्य फलार्थ निघू लागला. आळंदीत श्रीज्ञानदेव महाराजांच्या महाद्वारात तुकोबा कीर्तन करीत असता, ही प्रासादिक अभंगवाणी महापंडित रामेश्वरभट्टजी यांच्या कानावर जाऊन आदळली. त्यांना धक्काच बसला. ही गीताची किं मूर्तीमंत, किं नेणो श्रीमत् भागवत ॥ - ही प्रत्यक्ष वेदवाणीच आणि ती प्राकृतातून आणि ती तुकोबाच्या मुखातून !
तुकयाचे कवित्व ऐकून कानी । अर्थ शोधूनि पाहाता मनी ।
म्हणे प्रत्यक्ष हे वेदवाणी । त्याचे मुखे कानी न ऐकावी ॥
तरी यासी निषेधावे । सर्वथा भय न धरावे ॥
रामेश्वरशास्त्रींनी निषेध केला ते म्हणाले - “तुम्ही शूद्र आहात? तुमच्या अभंगवाणीतून वेदार्थ प्रगट होत आहे, तुमचा तो अधिकार नाही. तुमच्या मुखाने तो ऐकणे हा अधर्म आहे. तुम्हाला हा उद्योग कोणी सांगितला.” तुकोबा म्हणाले, “ही माझी वाणी नव्हे, ही देववाणी आहे.”
करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥२॥
नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल ।

श्रीमद् भागवत महापुराण स्कंध ४ था - अध्याय २१ वा

 श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय २१ वा
महाराज पृथूंचा आपल्या प्रजेला उपदेश - मैत्रेय म्हणतात - त्यावेळी महाराज पृथूंचे नगर सगळीकडे मोत्यांचे हार, फुलांच्या माळा, रंगी-बेरंगी वस्त्रे, सोन्याचे दरवाजे आणि अत्यंत सुगंधित धूपांनी सुगंधित झाले होते. त्यातील गल्ल्या, चौक, आणि सडका, चंदन आणि केशरयुक्त सुगंधित पाण्याने सिंचन केलेल्या होत्या. तसेच त्या फुले, अक्षता, फळे, यवांकुर, साळीच्या लाह्या आणि दिवे अशा मांगलिक वस्तूंनी सजविल्या होत्या. तेथे चौका-चौकांत लावलेले फळे-फुले यांच्या गुच्छांनी युक्त केळीचे खांब आणि सुपारीच्या झाडांनी ते नगर फारच मनोहर दिसत होते. तसेच सगळीकडे आंब्याच्या तोरणांनी ते विभूषित केले होते. जेव्हा महाराजांनी नगरात प्रवेश केला, तेव्हा दिवे, भेटवस्तू आणि अनेक प्रकारची मांगलिक सामग्री घेऊन आलेले प्रजाजन तसेच कुंडलांनी सुशोभित सुंदर कन्या त्यांना सामोर्‍या आल्या. शंख, दुंदुभी इत्यादी वाद्ये वाजू लागली. ऋत्विज वेदघोष करू लागले, बंदीजनांनी स्तुती आरंभिली. हे सर्व पाहून आणि ऐकूनसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण झाला नाही. अशा प्रकारे वीरवर पृथूंनी राजमहालात प्रवेश केला. वाटेमध्ये सगळीकडे नगरवासी आणि देशवासीयांनी त्यांचे अभिनंदन केले. परम यशस्वी महाराजांनीसुद्धा त्यांना प्रसन्नतापूर्वक इच्छित वर देऊन संतुष्ट केले. महाराज पृथू महापुरुषांना आणि सर्वांना पूजनीय होते. त्यांनी अशा प्रकारची अनेक औदार्याची कर्मे करीत पृथ्वीचे राज्य केले आणि शेवटी आपल्या विपुल यशाचा विस्तार करून भगवंतांचे परमपदही प्राप्त करून घेतले. (१-७)
सूत म्हणतात - शौनका ! अशा प्रकारे मैत्रेयांच्या तोंडून पृथूचे अनेक प्रकारच्या गुणांनी संपन्न आणि गुणवानांनी प्रशंसा केलेले विस्तृत सुयश ऐकून परम भागवत विदुराने त्यांची प्रशंसा करीत म्हटले. (८)
विदुर म्हणाला - ब्रह्मन, ब्राह्मणांनी पृथूला राज्याभिषेक केला. समस्त देवांनी भेटवस्तू दिल्या. त्यांनी आपल्या बाहूंमध्ये वैष्णव तेज धारण करून त्या बाहूंनी पृथ्वीचे दोहन केले. त्यांच्या त्या पराक्रमामुळे मिळालेल्या विषयभोगांद्वारेच आजही सर्व राजे तसेच लोकपालांसह समस्त लोक स्वतःच्या इच्छेनुसार जीवननिर्वाह करीत आहेत. असा कोण शहाणा असेल की, जो त्यांची पवित्र कीर्ती ऐकू इच्छित नाही ? म्हणून आता आपण मला त्यांचे आणखी पवित्र चरित्र ऐकवावे. (९-१०)
मैत्रेय म्हणाले - महाराज पृथू गंगा आणि यमुनेच्या मध्यवर्ती देशात निवास करून आपल्या पुण्यकर्मांचा क्षय करण्यासाठी प्रारब्धानुसार प्राप्त झालेले भोगच भोगीत होते. ब्राह्मणवंश आणि भगवंतांशी संबंधित विष्णुभक्तांना सोडून त्यांचे सात द्वीपांमधील सर्व पुरुषांवर अखंड आणि अबाधित शासन होते. एकदा त्यांनी एका महायज्ञाची दीक्षा घेतली. त्यावेळी तेथे देव, ब्रह्मर्षी आणि राजर्षींचा फार मोठा समाज एकत्र आला होता. त्या समाजात महाराज पृथूंनी त्या पूजनीय अतिथींचा यथायोग्य सत्कार केला आणि नंतर त्या सभेत नक्षत्रमंडलात चंद्र असावा, त्याप्रमाणे ते उभे राहिले. त्यांची शरीरयष्टी उंच, बाहू पुष्ट आणि लांब, रंग गोरा, नेत्र कमलाप्रमाणे अरुणवर्णाचे, नाक तरतरीत, मुख मनोहर, स्वरूप सौ‌म्य, खांदे उंच आणि हास्ययुक्त सुंदर दंतपंक्ती शोभत होत्या. त्यांची छाती रुंद, कमरेचा पाठीमागील भाग पुष्ट आणि पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे सुडौल असून वळ्यांमुळे आणखीच सुंदर दिसत होते. नाभी भोवर्‍याप्रमाणे गंभीर होती, शरीर तेजस्वी होते. जांघा सोन्याप्रमाणे दैदीप्यमान होत्या. तसेच पायांची ठेवण उभार होती. त्यांचे मस्तकावरील केस बारीक, कुरळे, काळे आणि सुंदर होते. मान शंखाप्रमाणे चढ-उतार असणारी आणि वळ्यांनी युक्त होती. त्यांनी बहुमूल्य रेशमी वस्त्रे आणि शेला परिधान केला होता. दीक्षेच्या नियमानुसार त्यांनी सर्व अलंकार काढून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या अंग-प्रत्यंगांची शोभा आपल्या स्वाभाविक रूपात स्पष्ट झळकत होती. त्यांनी शरीरावर काळविटाचे कातडे आणि हातामध्ये दर्भ धरले होते. त्यामुळे त्यांच्या शरीराची कांती अधिकच वृद्धिंगत झाली होती. त्यांनी आपली सर्व नित्यकर्मे यथासांग पूर्ण केली. राजा पृथूने सर्व सभेला जणू काही हर्ष-वर्षावाने ओलेचिंब करीत आपल्या शीतल आणि स्नेहपूर्ण नेत्रांनी चारी बाजूंना बघितले आणि नंतर आपले भाषण सुरू केले. त्यांचे भाषण अत्यंत सुंदर, आकर्षक शब्दांनी युक्त, स्पष्ट, मधुर, गंभीर आणि निःसंदिग्ध असे होते. जणू काही सर्वांना उपकृत करण्यासाठी ते आपले अनुभव कथन करीत होते. (११-२०)
पृथू म्हणाले - सज्जनहो, आपले कल्याण असो. आपण सर्व उपस्थित महानुभाव लोकहो, माझी प्रार्थना ऐका. जिज्ञासू पुरुषांनी संतसमाजामध्ये आपले मनोगत प्रगट करावे. या लोकी प्रजाजनांचे शासन, त्यांचे रक्षण, त्यांच्या उपजीविकेची सोय, तसेच त्यांना वेगवेगळेपणाने आपापल्या मर्यादेत ठेवण्यासाठी माझी राजा म्हणून नियुक्ती केलेली आहे. वेदज्ञ मुनींच्या मतानुसार, संपूर्ण कर्मांचे साक्षी श्रीहरी प्रसन्न झाल्यावर ज्या लोकाची प्राप्ती होते, तो मला मिळावा. या माझ्या मनोरथपूर्तीसाठी मी त्यांचे यथावत पालन करीन. जो राजा प्रजेला धर्ममार्गाचे शिक्षण न देता केवळ त्यांच्याकडून कर वसूल करण्यातच धन्यता मानतो, तो आपल्या प्रजेच्या पापाचाच भागीदार होतो आणि आपले ऐश्वर्य घालवून बसतो. म्हणून हे प्रिय प्रजाजनहो, आपल्या या राजाचे परलोकात हित करण्यासाठी आपण एकमेकांविषयींची दोष पाहाण्याची दृष्टी सोडून, हृदयात भगवंतांचे स्मरण करीत आपापल्या कर्तव्याचे पालन करीत राहा. कारण त्यातच तुमचा स्वार्थ आहे आणि याप्रकारे माझ्यावरही तुमचा अनुग्रह होईल. विशुद्धचित्त देव, पितर आणि महर्षिगण हो ! आपणही माझ्या या प्रार्थनेला दुजोरा द्या. कारण कोणतेही कर्म असो, मृत्यूनंतर त्याचा कर्ता, उपदेश करणारा आणि समर्थन करणारा, या सर्वांना त्याचे समान फळ मिळते. माननीय सज्जनहो, काही श्रेष्ठ महानुभावांच्या मतानुसार कर्माचे फळ देणारे भगवान यज्ञपतीच आहेत; कारण इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी कर्मफलस्वरूप काही काही भोगभूमी आणि शरीरे फार तेजस्वी दिसतात. मनू, उत्तानपाद, महीपती ध्रुव, राजर्षी प्रियव्रत, आमचे आजोबा अंग तसेच ब्रह्मदेव, शिव, प्रह्लाद, बली आणि या कोटीतील अन्यान्य महानुभावांच्या मते धर्म-अर्थ-काम-मोक्षरूप चतुर्वर्ग, स्वर्ग व मोक्ष यांची एकरूपता होण्यासाठी कर्मफलदाते म्हणून भगवान गदाधरांचीच आवश्यकता आहे. याविषयी केवळ मृत्यूचा नातू वेन इत्यादी काही शोचनीय अशा धर्मविन्मुख लोकांचीच मतभिन्नता आहे. म्हणून त्यांच्या मताचा विचार करणे योग्य नाही..

Thursday, 8 January 2015

संत संगतीचे महत्‍व

संत संगतीचे महत्‍व
एक दिवस नारद महर्षी संतसंगतीचे महत्‍व जाणून घेण्‍यासाठी भगवान श्रीकृष्‍णाकडे जातात व देवाला विनंती करतात की,देवा मला सतसंगतीचे महत्‍व सांगा.तेंव्‍हा देव सांगतात,नारदा तुला संतसंगतीचे महत्‍व जाणून घ्‍यायचे असेल तर मी सांगतो त्‍या प्रमाणे कर.एका कुंपणावरती एक सरडा आहे.तु त्‍याच्‍याकडे जा आणि त्‍याला संतसंगतीचे महत्‍व विचार.नारद महर्षी त्‍या सरड्याकडे येतात व हात जोडून त्‍या सरडयाला विनंती करतात की,मला संतसंगतीचे महत्‍व सांगा.जेव्‍ह सरडयाची आणि नारदाची नजरानजर होते तेव्‍हा तो सरडा मरुन खाली पडतो.
नारदमुनी परत देवाकडे जातात व झालेला प्रकार सांगतात.तेव्‍हा देव सांगतो,त्‍या पिंपळाच्‍या वृक्षावरती एक पोपट आहे.त्‍याला तु संतसंगतीचे महत्‍व विचार.देवाने सांगितल्‍या प्रमाणे नारद परत त्‍या वृक्षाजवळ येवून पोपटाला विनंती करतात की,मला संतसंगतीचे महत्‍व सांगा.परंतु जेव्‍हा नारदाची आणि पोपटाची नजरानजर होते तेंव्हा तो पोपट मरुन नारदाच्‍या पायाजवळ पडतो.तेव्‍हा नारद परत देवाकडे जातात व झालेला प्रकार कथन करतात.तेव्‍हा देव सांगतात की,राजाला मुलगा झालेला आहे,त्‍याकडे जाऊन त्‍याला सतसंगतीचे महत्‍व विचार.
नारद देवाला म्‍हणला,देवा तुच का सांगत नाहीस,तेव्‍हा देव सांगतात,की तु जा तर खरं। देवाच्‍या भिडेखातर नारद तेथून निघतात व राजवाडयात जाताना मनात विचार करतात की,आतापर्यंत जे झालं त्‍याचं कुणीही विचारायला नव्‍हतं परंतु आता जर असं काही झालं तर आपली काही बरी गत होणार नाही.अशा घाबरलेल्‍या परिस्थितीत नारद राजमहालात येतात.नारद राजमहालात आलेले पाहुन राजा त्‍यांचे योग्‍य ते आदरातिथ्‍य करतो.क्षेमकुशल विचारतो.काय निमित्‍तानं येणं केल। असा प्रश्‍न विचारतो.
नारद मनात अत्‍यंत भयभीत असतात.परंतु तसे न दाखवता आपल्‍याला मुलगा झाल्‍याचं कळलं म्‍हणून भेटायला आलो असे सांगतात.त्‍या छोटया मुलाला नारदाकडे आणण्‍याची व्‍यवस्‍था करतात व आणून ते नारदाच्‍या मांडीवर देतात.नारद भितीने घाबरुन गेलेले असतात,परंतु धैर्य करुन त्‍या छोटया मुलाला संतसंगतीचे महत्‍व विचारतात आणि काय आश्‍चर्य त्‍या छोटया मुलाला वाचा फुटते आणि तो मुलगा नारदांना सांगू लागतो,महाराज संतसंगतीचे महत्‍व काय सांगावं.आपण पहिल्‍यांदा मला भेटलात तेंव्‍हा मी सरडयाच्‍या योनीत होतो.आपल्‍या अल्‍प संगतीने मी तत्‍काळ मुक्‍त झालो.मला पोपटाचा जन्‍म मिळाला.तेथेही आपल्‍या अल्‍पशा संगतीने मला मुक्‍ती मिळून मी हया ठिकाणी राजवाडयात जन्‍माला आलो आहे.हा अल्‍पशा संतसंगतीचा परीपाक आहे.
सिध्‍दांत : संत संगतीचे महत्‍व शब्‍दातीत वर्णनातील आहे.ते शब्‍दांनी किंवा वाचेने सांगता येण्‍यासारखे नाही.कारण संतसंगतीचे महत्‍व प्रत्‍यक्ष देवालाही सांगता येत नाही.म्‍हणून देवदेखील संतसंगतीची इच्‍छा करतो.
प्रमाण : १} देव इच्‍छी रज चरणांची माती । धावत चालती मागे मागे ॥ संत तु.
२} अर्धक्षण घडता संतांची संगती । तणे होय शांती महत्‍पापा ॥ संत तुकाराम
३} संत संगती वेगळे । तात्‍काळ पावावया माझे स्‍थान ।
आणिक नाहीच साधन॥ हे सत्‍य जाण उध्‍दवा ॥ भागवत ॥

नाम - रूपाचा संबंध !

नाम - रूपाचा संबंध !
नाम घेत असताना रूपाचे ध्यान
आवश्यक आहे का ? वास्तविक,
नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच. 
पण नाम हे रूपाच्या आधीही असते
आणि नंतरही उरते. नाम रूपाला
व्यापून असते. राम जन्माला येण्यापूर्वी
वाल्मीकींनी रामायण लिहिले, आणि
रामाने मागाहून जन्म घेऊन त्यात
वर्णन केल्याप्रमाणे आचरण करून
दाखविले.
म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वी
नाम होते, आणि रूप गेल्यानंतर आजही
नाम शिल्लक आहे. देशकालाच्या
पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय.
प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे
नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून
राहते. म्हणजे नाम हे देशकालाच्या
पलीकडे असते; म्हणजे ते रूपापेक्षा
जास्त सत्य असते. जे सत्य आहे ते
श्रेष्ठ असलेच पाहिजे. तेव्हा नाम घेणे ही
गोष्ट मुख्य आहे. ते घेत असताना
रूपाचेही ध्यान राहिले तर उत्तमच;
पण ते तसे न राहिले, तरी नाम घेत
असताना रूपाचे स्मरण सूक्ष्मरूपाने
असतेच असते. समजा, एका
गृहस्थाच्या घरी राम नावाचा गडी आहे.
तो गृहस्थ 'राम राम' असा जप करीत
बसला आहे, पण त्याचे लक्ष
राम-रूपाकडे नाही, मनात काहीतरी
दुसरेच विचार चालू आहेत. अशा वेळी
त्याला जर एकदम विचारले की, 'तुम्ही
कुणाचे नाव घेत आहात' तर अर्थात्
'रामाचे' असेच उत्तर तो देईल. हे उत्तर
देताना त्याच्या मनात "दाशरथी राम"
हीच व्यक्ती असणार. "राम गडी" ही
व्यक्ती नसणार. याचाच अर्थ असा की,
नाम घेत असताना रूपाचे ध्यान
सूक्ष्मरूपाने आत जागृत असते.
म्हणूनच, रूप ध्यानी येत नाही
म्हणून अडून बसू नये. नामस्मरण
करण्याचा अट्टाहास ठेवावा, त्यात
सर्व काही येते.
एखाद्या माणसाची आणि आपली
ओळख असेल तर पहिल्याने त्याचे
रूप पुढे येते आणि नंतर नाम येते.
पण आपली त्याची ओळख नसेल,
आणि आपण त्याला बघितलेला नसेल,
तर त्याचे फक्त नाव येते. आज
आपल्याला भगवंताची ओळख नाही,
म्हणून त्याचे रूप माहिती नाही; परंतु
आपल्याला त्याचे नाम घेता येईल.
सध्यासुद्धा, त्याचे नाम घेताना त्याची
आठवण आपल्याला होते हा आपला
अनुभव आहेच. भगवंताचे रूप तरी
निश्चित कुठे आहे ? एक राम 'काळा'
तर एक 'गोरा' असतो; एक राम
'लहान' तर एक 'मोठा' असतो;
पण सर्व रूपे रामाचीच असतात.
भगवंत स्वतः अरूप आहे; म्हणून
जे रूप आपण त्याला द्यावे तेच
त्याचे रूप असते. यासाठी आपण
कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान
केले तरी चालते. नामातून अनंत
रूपे उत्पन्न होतात आणि अखेर
त्यामध्येच ती लीन होतात. म्हणून
भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे. हे त्याचे
नाम तुम्ही आवडीने, अखंड घ्या
आणि आनंदात रहा.
६. दानात दान अन्नदान,
उपासनेत उपासना सगुणाची
उपासना, आणि साधनात
साधन नामस्मरण.

नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे.

नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे.
नामाचे प्रेम का येत नाही, हा प्रश्न बहुतेकजण विचारतात. पण थोडासा विचार केला तर असे लक्षात येईल की, हा प्रश्नच बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईने, 'मुलाचे प्रेम कसे येईल ?' असे विचारण्यासारखाचहा प्रश्न आहे. मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असते. तेव्हा 'मुलाचे प्रेम कसे येईल' हा प्रश्न करण्याऐवजी 'मूल कसे होईल' याचाच विचार करणे बरोबर ठरेल. आपणसुद्धा प्रश्न करायचाच असेल तर 'नामाचे प्रेम कसे येईल' असाकरण्याऐवजी, 'मुखी नाम कसे येईल' असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे ? दुसर्या कोणाचीही नसून आपली स्वत:चीच आहे. वास्तविक, एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरूवात केली की झाले. पण तसेहोत नसेल तर, दोष दुसर्या कोणाचा नसून आपला स्वत:चाच आहे. म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे; मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. जसे आईच्या बाबतीत, मूल आणि प्रेमाचा पान्हा ही निराळी असूच शकत नाहीत, तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. ह्यावरून एक गोष्ट अशी ठरली की, 'प्रेम का येत नाही', याचे उत्तर आमच्याजवळच आहे, आणि ते म्हणजे, 'नाम घेत नाही म्हणून.' यावर कोणी असे म्हणेल की, आम्ही नाम घेतोच आहोत, तरीही प्रेम का येत नाही ? हे विचारणे ठीक. पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो, त्याचा विचार केला तर काय दिसेल ? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो, तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरूने, नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो, किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो, इतकेच. अर्थात्, तसे घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच. पण 'प्रेम का येत नाही', असा प्रश्न विचारण्यापूर्वी, आपण नाम किती आस्थेने घेतो, हा प्रश्न स्वत:ला विचारणे जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्याबाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरूर आहे.आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला नकळत होते, तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला नकळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात 'मिळविण्यापेक्षा' मिळविलेले 'टिकविणे', हेच जास्त कठीण आहे. ज्याला 'मी काही तरी झालो' असे वाटते तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे.

श्री नामदेव महाराज...........

श्री नामदेव महाराज हे महाराष्ट्राच्या नाम-विद्येचे आद्य-प्रणेते आहेत.
नाम व नामी या द्विपुटीचे, आंतर अद्वैत, श्रीनामदेवांनी स्वानुभवाने व स्व:तच्या चतुर्विध वाणीने सिद्ध व प्रसिद्ध केले आहे. परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी या चतुर्वेदीवर श्रीनामदेवांची नामज्वाला, अखंडतेने प्रस्फुरत होती.
कर्म-किंकर होऊन चौर्‍याऐंशी लक्ष योनी हिंडणार्‍या जीवाला नाम-योग समजला की तत्क्षणीच त्याला महा-जागर येतो, महामोक्ष लाभतो; स्वयं सच्चिदानंदरूप असणारे स्व-स्वरूप त्याच्या अनुभवास येते.
कर्म-नियतीचे बंध, एका झटक्यात, तोडण्याचे सामर्थ्य एका नाम-साक्षात्कारांत आहे. नाम एकदाच घ्यावयाचे असते, दोनदा नव्हे. मात्र ते घेता येण्यासाठी अनेक जन्मांची संसिद्धी लागते.
‘नाम’ हाच देव; आणि त्या देवाचे प्रत्यक्ष दर्शन, त्याचा साक्षात्कार, श्री नामदेवांच्या शरीरधारणेने, महाराष्ट्राला व भारताला झाला. श्री नामदेवांचा अवतार म्हणजे नामयोगाचा अवतार होय.
नाम व नामी यांचे अद्वैत अनेक तर्‍हेने प्रकट होत असते. अनेक तर्‍हेने अनुभवावयाचे असते.
नामाकडून नामीकडे असा प्रवास सहज सिद्ध आहे. ‘नाम’वंत व भागवंत यांचे मधले अंतर खरोखर काल्पनिकच आहे. नाम-वंत क्षणार्धात भगवंत होतो. ‘नाम’ एकदाच व क्षणमात्र घेता आले की ती व्यक्ति ‘देव’रूप होते, देवत्व पावते. ‘नाम’ कोट्यवधी वेळा घ्यावयाचे नसते. नाम खरोखरच एकदाच घ्यावयाचे असते. अगदी एकदाच, दोनदा नव्हे, व पुनश्च कधीही नव्हे नाम एकदा घेतले, घेता आले की दुसरे काहीच घेता, देता येत नाही. कारण, नंतर ‘नाम’ आपणास घेते; आपण ‘नामाला’ घेत नाही, आपण शिल्लकच उरत नाही.
नाम म्हणजेच नामी असल्यामुळे नाम घेणे म्हणजे ‘नामी’ घेणे, देव घेणे, देवत्व पावणे, असे नव्हे काय? देवत्व पावणे ही क्रिया, हा अनुभव एकदाच यावयाचा असतो. हजारो वेळा देवत्व कसे पावता येईल?
एकदा नामी म्हणजे देव मिळाल्यावर त्याला पुन: कसे मिळविता येईल? एकदा देव मिळाल्यावर तो देव हरवावा लागेल व तरच त्या देवाला पुन: मिळविता येईल. दोन वेळा ‘नाम’ घेणे दोन वेळा नामी मिळविणे शक्यच नाही.
न्यायदर्शनाप्रमाणे प्राक अ-भाव असेल तरच भाव शक्य होतो.
देव मिळण्यापूर्वी, न मिळालेला, असला पाहिजे, मिळालेली वस्तू पुन: मिळविता येणार नाही. ती हरवली तर मात्र पुन: मिळविणे शक्य होते. एकदा देव मिळाल्यावर तो हरवता येत नाही.
एकदा देव मिळाल्यावर, फक्त स्वत:ला हरवता येते. स्वत:ला शिल्लक राहता येत नाही. जे काही राहते ते देवच असे नसले तर देवाकडे अल्पत्व येईल व भक्ताकडे बृहत + त्व जाईल. देव हा अंश व भक्त ‘पूर्ण’ असा व्यत्यास होईल.
देव मिळविणे म्हणजे एकादी ‘वस्तू’ मिळविणे नव्हे. स्वत:ची देवात मिळवणी करणे म्हणजे देव मिळविणे.
माझ्यात देव मिळवावययाचा नाही. मी देवात मिळवून व मिळून जावयाचे.
नाम-योगाची प्रक्रिया अशी विलक्षण आहे! नाम-योग म्हणजे ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग यांचा व यावत् शक्य सर्व योगांचा, समन्वय योग आहे. कारण, सर्व योगांची मूलतत्त्वे नामयोगात अंतर्भूत व अनुस्यूत असून शिवाय त्या सर्व योगांचा तो लघुतम विभाग आहे.
नामयोग ही बीज-विद्या आहे. शाखा शास्त्र नव्हे. नामयोग साधला किंवा नामाचा एकदाच योग आला की विश्वभास मावळाच नवलचंडाशूचा उदयच तो!
एकदा, अगदी एकदाच नाम घेतल्यावर, ‘नाम’ आपणास घेऊन, ग्रासून टाकते. आपण ‘नाम’ घेण्यास शिल्लकच उरत नाही. असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, साहित्य शास्त्रातला अलंकार नव्हे - शाब्दिक कोटि नव्हे व अर्थ चमत्कृति नव्हे.
श्रीसंत तुलसीदास यांनी एका मातेला हाच उपदेश केला होता. तिचे बालक मृत झाले होते. तुळसीदास म्हणाले, “एकदाच रामनाम घे म्हणजे ते मूल जिवंत होईल.”
बिचारीने रामनामाचा लक्ष-घोष केला. मूल जिवंत झाले नाही. तुलसीदासांनी एकदाच रामनाम घेतले व त्या बाईचे मृत मूल एकदम हसू खेळू लागले!
श्री नामदेवांनी निर्व्याज्य, निरागस व ‘अखंडार्थ-वृत्तीने’ दुधाबरोबर, स्वत:चा सर्वस्वाचा ‘नैवेद्य’ दाखवून एकदाच पांडुरंगाचे नाव घेतले याचा अर्थ -पांडुरंगाने हा नैवेद्य स्वीकारला व नामदेव अंतर्धान पावून त्यांचे ठायी पांडुरंग जिवंत झाला.
नाम्याचा श्वास सरला, त्यानंतर देवाचा सुरू झाला. नाम-नामी एक झाले. नाम म्हणजेच देव हा सिद्धांत महाराष्ट्रात मानव देहाने वावरू लागला. ज्ञानाची, ज्ञानराजाची साथ करीत करीत सहवास घेत घेत, उत्तर-भारतात हा सदेह सिद्धान्त, संचार करून परत पांडुरंगाचे पायी आला. नामदेव हे नाम देह होते. त्यांचा देह हे साक्षात् व साकारलेले नाम होते.
नामदेवाची देववाणी म्हणजे प्रत्यक्ष श्रुति-बाला आहे. साक्षात् बाल सरस्वती आहे. नामदेवाच्या देववाणीला, बाल-सरस्वतीला, सरल-सुंदर शब्दसाज भक्तराज बाल प्रल्हादाने चढविला आहे. ही कलाकृति इतक्या हळुवारपणे, दुसरे कोण करू शकेल?
!!जय जय राम कृष्ण हरि!!

Saturday, 3 January 2015

पुत्रदा एकादशी व्रत कथा

पुत्रदा एकादशी व्रत कथा
पौष शुक्ल एकादशी.........
महाराज युधिष्ठिर ने पूछा- हे भगवान! आपने सफला एकादशी का माहात्म्य बताकर बड़ी कृपा की। अब कृपा करके यह बतलाइए कि पौष शुक्ल एकादशी का क्या नाम है उसकी विधि क्या है और उसमें कौन-से देवता का पूजन किया जाता है।
भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण बोले- हे राजन! इस एकादशी का नाम पुत्रदा एकादशी है। इसमें भी नारायण भगवान की पूजा की जाती है। इस चर और अचर संसार में पुत्रदा एकादशी के व्रत के समान दूसरा कोई व्रत नहीं है। इसके पुण्य से मनुष्य तपस्वी, विद्वान और लक्ष्मीवान होता है। इसकी मैं एक कथा कहता हूँ सो तुम ध्यानपूर्वक सुनो।
भद्रावती नामक नगरी में सुकेतुमान नाम का एक राजा राज्य करता था। उसके कोई पुत्र नहीं था। उसकी स्त्री का नाम शैव्या था। वह निपुत्री होने के कारण सदैव चिंतित रहा करती थी। राजा के पितर भी रो-रोकर पिंड लिया करते थे और सोचा करते थे कि इसके बाद हमको कौन पिंड देगा। राजा को भाई, बाँधव, धन, हाथी, घोड़े, राज्य और मंत्री इन सबमें से किसी से भी संतोष नहीं होता था।
वह सदैव यही विचार करता था कि मेरे मरने के बाद मुझको कौन पिंडदान करेगा। बिना पुत्र के पितरों और देवताओं का ऋण मैं कैसे चुका सकूँगा। जिस घर में पुत्र न हो उस घर में सदैव अँधेरा ही रहता है। इसलिए पुत्र उत्पत्ति के लिए प्रयत्न करना चाहिए।
जिस मनुष्य ने पुत्र का मुख देखा है, वह धन्य है। उसको इस लोक में यश और परलोक में शांति मिलती है अर्थात उनके दोनों लोक सुधर जाते हैं। पूर्व जन्म के कर्म से ही इस जन्म में पुत्र, धन आदि प्राप्त होते हैं। राजा इसी प्रकार रात-दिन चिंता में लगा रहता था।
एक समय तो राजा ने अपने शरीर को त्याग देने का निश्चय किया परंतु आत्मघात को महान पाप समझकर उसने ऐसा नहीं किया। एक दिन राजा ऐसा ही विचार करता हुआ अपने घोड़े पर चढ़कर वन को चल दिया तथा पक्षियों और वृक्षों को देखने लगा। उसने देखा कि वन में मृग, व्याघ्र, सूअर, सिंह, बंदर, सर्प आदि सब भ्रमण कर रहे हैं। हाथी अपने बच्चों और हथिनियों के बीच घूम रहा है।
इस वन में कहीं तो गीदड़ अपने कर्कश स्वर में बोल रहे हैं, कहीं उल्लू ध्वनि कर रहे हैं। वन के दृश्यों को देखकर राजा सोच-विचार में लग गया। इसी प्रकार आधा दिन बीत गया। वह सोचने लगा कि मैंने कई यज्ञ किए, ब्राह्मणों को स्वादिष्ट भोजन से तृप्त किया फिर भी मुझको दु:ख प्राप्त हुआ, क्यों?
राजा प्यास के मारे अत्यंत दु:खी हो गया और पानी की तलाश में इधर-उधर फिरने लगा। थोड़ी दूरी पर राजा ने एक सरोवर देखा। उस सरोवर में कमल खिले थे तथा सारस, हंस, मगरमच्छ आदि विहार कर रहे थे। उस सरोवर के चारों तरफ मुनियों के आश्रम बने हुए थे। उसी समय राजा के दाहिने अंग फड़कने लगे। राजा शुभ शकुन समझकर घोड़े से उतरकर मुनियों को दंडवत प्रणाम करके बैठ गया।
राजा को देखकर मुनियों ने कहा- हे राजन! हम तुमसे अत्यंत प्रसन्न हैं। तुम्हारी क्या इच्छा है, सो कहो। राजा ने पूछा- महाराज आप कौन हैं, और किसलिए यहाँ आए हैं। कृपा करके बताइए। मुनि कहने लगे कि हे राजन! आज संतान देने वाली पुत्रदा एकादशी है, हम लोग विश्वदेव हैं और इस सरोवर में स्नान करने के लिए आए हैं।
यह सुनकर राजा कहने लगा कि महाराज मेरे भी कोई संतान नहीं है, यदि आप मुझ पर प्रसन्न हैं तो एक पुत्र का वरदान दीजिए। मुनि बोले- हे राजन! आज पुत्रदा एकादशी है। आप अवश्य ही इसका व्रत करें, भगवान की कृपा से अवश्य ही आपके घर में पुत्र होगा।
मुनि के वचनों को सुनकर राजा ने उसी दिन एकादशी का ‍व्रत किया और द्वादशी को उसका पारण किया। इसके पश्चात मुनियों को प्रणाम करके महल में वापस आ गया। कुछ समय बीतने के बाद रानी ने गर्भ धारण किया और नौ महीने के पश्चात उनके एक पुत्र हुआ। वह राजकुमार अत्यंत शूरवीर, यशस्वी और प्रजापालक हुआ।
श्रीकृष्ण बोले- हे राजन! पुत्र की प्राप्ति के लिए पुत्रदा एकादशी का व्रत करना चाहिए। जो मनुष्य इस माहात्म्य को पढ़ता या सुनता है उसे अंत में स्वर्ग की प्राप्ति होती है.